अकबर बिरबल यांच्या मजेशीर गोष्टी Akbar Birbal Story In Marathi

Akbar Birbal Story In Marathi

मेनाचा वाघ-Akbar Birbal Story In Marathi

Akbar Birbal Story In Marathi

हिवाळ्याचा महिना चालू होता. अकबराचा दरबार पूर्ण भरला होता. त्या दरबारामध्ये शेजारच्याच राजाने पाठवलेला एक सेवकही उपस्थित होता.

त्या राजाने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी त्या सेवकाजवळ एक मेना पासून बनवलेला वाघ एका पिंजरा मध्ये बंद करून पाठवला होता आणि असे सांगण्यात आले होते की पिंजरा न खोलता या वाघाला बाहेर काढून दाखवा.

दरबारामध्ये बीरबल नसल्यामुळे अकबर विचारात गुंतला होता की या समस्यांमधून मार्ग कसा काढावा. जर आपण या वाघाला बाहेर काढले नाही तर सर्व लोक आपल्यावर हसतील. एवढ्यात बुद्धिमान चतुर आणि हुशार बिरबल दरबारामध्ये येऊन सर्व सूत्रे आपल्या हाती घेतो.

तेव्हा बिरबलाने एक गरम सळई मागवली आणि ती पिंजऱ्यामध्ये घालून तो मेना पासून बनवलेला वाघ वितळविला. बघता बघता मेन वितळून बाहेर येऊ लागले. अकबर-बिरबलाच्या कल्पनेवर खूप प्रसन्न झाला आणि पुन्हा त्या राजाने अकबराला आव्हान दिले नाही.

तात्पर्य बुद्धीच्या जोरावर कितीही मोठ्या समस्येवर मात केली जाऊ शकते.

विहिरीतल्या पाण्याची मालकी कोणाची - Abar Birbal Story In Marathi

Akbar Birbal Story In Marathi

एकदा एका माणसाने आपली विहीर गावातील एका शेतकऱ्याला विकली. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी विहिरीतील पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ आला तेव्हा त्या माणसाने शेतकऱ्याला विहिरीतील पाणी काढण्यासाठी मनाई केली आणि म्हणाला मी तुला हि विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, हे ऐकून तो शेतकरी दुःखी झाला आणि मदत मागण्यासाठी अकबराकडे गेला

बादशहा अकबराने थोडा विचार करून बिरबलाला दरबारात बोलावले आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सांगितले. सर्व हकीकत ऐकल्यानंतर बिरबलाने त्या माणसाला बोलावले ज्याने शेतकऱ्याला विहीर विकली होती. नंतर त्या माणसाला विचारण्यात आले की तू शेतकऱ्याला या विहीरीतून पाणी का काढून देत नाहीस तू तर ही विहीर शेतकऱ्याला विकली आहेस ना? तेव्हा तो म्हणाला मी शेतकऱ्याला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही.

तेव्हा बिरबल हसत म्हणाला की तू फक्त विहीरच शेतकऱ्याला विकली आहेस आणि पाणी नाही तेव्हा तुला या विहिरींमध्ये पाणी ठेवण्याचा काहीही अधिकार नाही तेव्हा तू लगेच या विहिरीतील पाणी काढून ने नाहीतर त्याचे व्याज शेतकऱ्याला दे. एवढे ऐकून तो माणूस समजला की आपले या महाचतुर माणसासमोर काहीही चालणार नाही तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली आणि त्या शेतकऱ्याला व्याजही दिले. बिरबलाच्या या न्यायावर अकबर ही खुश झाला.

डोळे असलेलीआंधळी माणसे - Akbar Birbal Story In Marathi

Akbar Birbal Story In Marathi

राजाचा दरबार भरलेला असताना राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना विचारले की आपल्या राज्यांमध्ये डोळे असलेल्या आंधळ्या लोकांची संख्या किती आहे. त्यावर सर्व मंत्री एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आणि कोणालाही याचे उत्तर सांगता येत नव्हते. त्याच दरबारामध्ये बिरबल ही उपस्थित होता. बिरबलाला ही हा प्रश्न विचारण्यात येतो.

तेव्हा बिरबल म्हणतो राजे मला याचे उत्तर देता येणार नाही परंतु आपल्या राज्यात डोळे असलेल्या आंधळ्याची संख्या भरपूर आहे. राजाने विचारले, असे तु ठामपणे कसे सांगू शकतो? त्यावर बिरबल म्हणतो, राजा मला दोन दिवसाची मुदत द्या मी तुम्हाला या दोन दिवसांमध्ये अशा लोकांची नावे आणून देतो.

दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपला बिछाना अंगणात आणला आणि त्याचे राहिलेले अर्धे काम पूर्ण करू लागला. बिरबलाने रस्त्यावरून चाललेल्या एका माणसाला बोलावले आणि कागद-लेखणी घेऊन बसण्यास सांगितले.

रस्त्यावरून जाणारी सर्व लोक बिरबलाला येऊन विचारत होती की, हे काय चालले आहे?. बिरबलाने त्या सर्व लोकांची नावे लिहून घेण्यास सांगितले. बघता बघता ही माहिती संपूर्ण गावामध्ये पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोक येऊन पाहू लागले की बिरबल हे काय करत आहे.

या गोष्टीची राजाला ही उत्सुकता होती त्यामुळे राजाही येऊन बिरबलाला विचारू लागला की बीरबल हे काय चालू आहे. तेव्हा बिरबलाने राजाचे नाव त्या कागदावर सर्वात वर लिहिण्यास सांगितले. दोन दिवसानंतर बिरबल तो कागद घेऊन दरबारात पोहोचला.

तेव्हा राजाने विचारले या कागदावर माझे नाव सर्वप्रथम का आहे? बिरबल म्हणाला मी माझ्या बिछान्याचे काम करत होतो हे पाहत असूनही लोक मला विचारत होते आणि तुम्हालाही उत्सुकता असल्यामुळे तुम्हीही माझ्या घरी आलात, तुम्ही राजा असल्यामुळे तुमचे नाव सर्वप्रथम असावे अशी माझी इच्छा होती.

राजा हसून म्हणाला की तू खूप हुशार आणि बुद्धिमान आहे शेवटी तू अशा लोकांची नावे शोधून काढली ज्यांना डोळे असूनही ती आंधळी आहेत.

आग्र्यातील कावळ्यांची संख्या - Akbar Birbal Story In Marathi

Akbar Birbal Story In Marathi

एके दिवशी अकबर बादशहा सर्वांच्या आधी दरबारामध्ये पोचले. आणि मागून येणाऱ्या सर्व मंत्र्यांना विचारू लागले की आग्रा मध्ये कावळ्यांची संख्या किती आहे?. हे ऐकून सर्व मंत्री शांत झाले. कोणालाही याचे उत्तर देता येत नव्हते. चुकीचे किंवा बरोबर कोणीही उत्तर देत नव्हते. तेव्हा बिरबल दरबारामध्ये हजर होतो.

त्यालाही हाच प्रश्न विचारण्यात येतो. बिरबलाने पटकन उत्तर दिले ही मागच्याच वर्षे कावळ्यांची जनगणना करण्यात आली होते. आग्रा मध्ये एकूण पंधराशे कावळे आहेत.

अकबर बादशहा कावळ्यांचे स्पष्ट संख्या ऐकून चकित झाला आणि म्हणाला तू कावळ्यांची संख्या केव्हा मोजली? मला त्याचा संदर्भ दे. तुझ्यापाशी दोन दिवसाचा वेळ आहे या दोन दिवसांमध्ये तू पूर्ण विचार करून मला त्यांची संख्या सांग नाहीतर तुला दहा हजार सुवर्णमुद्रांचा दंड भरावा लागेल.

हे ऐकून बिरबल म्हणाला मी मोजलेल्या संख्या बरोबरच आहे त्यामध्ये तेव्हाच तफावत असेल जेव्हा आग्रा मधून काही कावळे बाहेर गेले असतील किंवा काही बाहेरचे पाहुणे कावळे आग्रा मध्ये आले असतील.

बिरबलाचे हे बोलणे ऐकून राजा खूष झाला आणि त्याला दहा हजार रुपये सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून दिल्या.

पृथ्वीचा मध्य - Akbar Birbal Story In Marathi

Akbar Birbal Story In Marathi

अकबर बादशहाचा एक मंत्री अकबर बादशहाचे बिरबल विरुद्ध कान भरत होता. तो म्हणाला बादशाह तुम्ही बिरबलाला उगाचच ठेवले आहे त्याचे काही कामच नाही. त्यावर बादशहा म्हणाला बिरबल ! बिरबल तर फार हुशार व्यक्ती आहे. तो प्रत्येक प्रश्नाची उत्तरे इतकी सहजपणे आणि उत्कृष्ट पद्धतीने देतो.

त्यावर तो मंत्री म्हणाला महाराज जर बिरबलाने मी केलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली तर आपण त्याला मानू.

प्रश्न १ पृथ्वीचा मध्य कोठे आहे? प्रश्न २ आकाशात तारे किती आहेत? प्रश्न ३ पृथ्वीवर स्त्री-पुरुषांची संख्या किती आहे?

लगेच बादशहाने बिरबलाला आमंत्रण पाठविले. बिरबल लगेच दरबारामध्ये उपस्थित झाला. झालेली हकीकत बिरबलाला व्यवस्थित रित्या सांगण्यात आली.

बिरबल विचार करू लागला नंतर त्याने एक लाकडाची काठी आणली आणि ती दरबारामध्ये रोवली आणि म्हणाला हा आहे पृथ्वीचा मध्य विश्वास बसत नसेल तर मोजून पहा.

आकाशामध्ये तारे किती आहेत याचे उत्तर देताना बिरबलाने एक बकरी आणली आणि ती दरबारामध्ये ठेवली आणि म्हणाला महाराज या बकरीच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढेच आकाशामध्ये तारे आहेत विश्वास बसत नसेल तर मोजून पहावे.

तिसऱ्या प्रश्नाची म्हणजे स्त्री व पुरुषांची संख्या किती आहे याचे उत्तर देताना बिरबल म्हणाला स्त्री-पुरुषांची संख्या तेव्हाच समान होईल जेव्हा ह्या मंत्र्याला आपण ठार मारू कारण हा ना तर स्त्री आहे ना तर पुरुष.

हे ऐकताच तो मंत्री दरबार सोडून पळून गेला व अकबराने बिरबलाच्या सत्कार केला आणि प्रशंसा करत राहिला.

बैलाचे दूध - Akbar Birbal Story In Marathi

Akbar Birbal Story In Marathi

दरबार भरला होता आणि दरबाराचे काम चालू होते. दरबार संपल्यानंतर अकबराने बिरबलाला सांगितले बिरबल मला बैलाचे दूध पाहिजे आहे. तू मला ते आणून दे. एका वैद्यांनी मला एक औषध सांगितले आहे त्यासाठी बैलाचे दूध लागणार आहे तू काहीही करून मला बैलाचे दूध आणून दे. यावर थोडा विचार करून म्हणाला महाराज मला दोन चार दिवस द्या मी त्यामध्ये तुम्हाला बैलाचे दूध आणून देण्याचा प्रयत्न करीन.

यावर अकबर म्हणाला सात-आठ दिवस घे पण मला बैलाचे दूध आणून दे. हे झाल्यानंतर बिरबल त्याच्या घरी गेला. काही वेळाने तो त्याच्या मुलीला म्हणाला मी सांगेन तसे करायचे. महाराज अकबर यांच्या महालाच्या बाजुलाच एक नदी आहे त्या नदीवर मध्यरात्री जाऊन जोरात कपडे धुवायचे त्याचा आवाज अकबर यांच्यापर्यंत गेला पाहिजे.

वडिलांचे बोलणे ऐकून दुसर्या दिवशी मध्यरात्री बिरबलाच्या मुलीने तसेच केले. ती मध्यरात्री त्या नदीवर गेली आणि तिथे जोरात कपडे आपटून लागली. या होणाऱ्या जोरदार आवाजामुळे अकबराची झोप मोड झाली आणि तो क्रोधित झाला. त्याने शिपायांना आदेश दिला जो कोणी मध्यरात्री जोरात आपटून कपडे धूत आहे त्याला तात्काळ माझ्याकडे घेऊन या.

शिपायांनी त्यांच्या महाराजांचा आदेश पाळला आणि त्या मुलीला घेऊन ते महालात आले. महालात आल्यानंतर अकबराने विचारपूस केली एवढी गरजच काय एवढ्या रात्री कपडे धुवायची?

त्यावर त्या मुलीने घाबरत घाबरत उत्तर दिले काल मला खूप काम होते कारण माझ्या वडिलांना मूळ झाले. त्यामुळे माझा सर्व दिवस याच कारणामुळे व्यक्त केला. म्हणून माझी इतर कामे झाली नाहीत त्यामुळे मी एवढ्या रात्री माझी कामे करण्याचा निर्णय घेतला म्हणून मी मध्यरात्री कपडे घेऊन नदीवर धुण्यासाठी आले.

यावर अकबर बोलला काय बोलतेस!!! पुरुषाला मूल कसे होईल?

त्यावर त्या मुलीने उत्तर दिले 'हो महाराज तुमचे बरोबर आहे जसे बैल दूध देऊ शकतो तसेच पुरुष देखील मुले देऊ शकतोस ना?'

यावर लगेच अकबराला कळाले की व्यक्ती बहुदा बिरबलाने पाठवली असावी. नंतर त्या मुलीने अकबराला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि अकबराने आपली चूक मान्य केली.

Read More
Categories